Posts

Showing posts from December, 2020

शेतीचा श्रीगणेशा

Image
 शेतीचा श्रीगणेशा -------- शेती म्हणजे बुडिताचा धंदा. त्यात काही राम उरलेला नाही, असं म्हणत अनेक तरुण गावांतून शहरात येतात. छोटासा व्यवसाय सुरू करतात. किंवा कारखान्यात कामगार होणेही स्वीकारतात. पण आम्हाला एक तरुण असा भेटला. ज्याच्या डोळ्यातील चमक काही वेगळीच होती. कारण उच्चशिक्षित असूनही तो नोकरीच्या मागे न लागता चक्क शेतीकडे वळाला. त्याचे नाव गणेश जोशी. वय अवघे ३० वर्षे. शिक्षण एमए मास कम्युनिकेशन म्हणजे पत्रकारितेचे. पण वाट्याला आलेल्या तीन एकर जमिनीत नैसर्गिक शेती करत आहेत. कापूस, तूरडाळ, भाज्या, मोसंबी, हरभरा, ज्वारी अशी पिके घेऊन त्यांचा जीवनाशी हसतमुखाने संघर्ष सुरू आहे. आणि त्यांचा हा संघर्ष शेती सोडून शहराकडे धावणाऱ्या हजारो तरुणांना प्रेरणा देणारा आहे. पण हे कसे घडले. गावातून शहरात आणि शहरातून गावात गणेशचा प्रवास कसा झाला. त्याची कहाणी अत्यंत रोचक आहे. घरी शेती होती. पण त्यातून पोट भरेल अशी स्थिती नव्हती. मग मास कम्युनिकेशनमध्ये एमए केल्यावर एकच मार्ग समोर दिसत होता. तो त्यांनी स्वीकारला. गणेश ‘सकाळ’ वर्तमानपत्रात पत्रकार म्हणून काम करू लागले. चाकरमाने झाले. शेती विकून टाक...

जमीन - विशुद्ध - पुढची पिढी

नाव  - श्री गणेश जोशी वय  - ३० वर्षे शेती - ३ एकर  नैसर्गिक शेती  शिक्षण - MA Mass Communication  पीक - कपाशी, तुरडाळ,भाज्या, मोसंबी, हरबरा, ज्वारी  अगदी ३० वर्षाचे जोशी बोलताना खूप मोठा संदेश देऊन गेले. MA केले होते, पत्रकारितेची नोकरी सकाळ मध्ये करत होते, आणि काही कारणाने आचार्य विनोबा भावे ह्यांच्या आश्रमात राहण्याचा योग आला. कामानिमित्त होते पण राहणे झाले, वाचन झाले.  सुरवातीचे विचार असे होते की शेती विकावी, औरंगाबाद मध्ये घर घ्यावे, गाडी घ्यावी, white color नोकरी करावी. पण आश्रमात जाऊन, राहून आल्यावर डोक्यात विचार घोळू लागले आणि मनात असे आले की आपण पुढच्या पिढीला फक्त भौतिक जगणे शिकवणार आहोत का, आपल्याकडे पिकणारे अन्न जर काळ्या माती ऐवजी त्या रसायनांच्या जमिनीतील असेल तर पुढची पिढी कशी घडवलं. जे आपण लहान पणापासून आई वडील ह्यांच्या कडून शिकलो आणि त्यातूनच आपले शिक्षण केले, उत्तम तब्येत राखली ते जर आपण पुढच्या पिढीला नाही देऊ शकलो तर काय उपयोग.  श्री गणेश जोशी ह्यांनी स्वतःचे ते white color जे स्वप्न बाजूला ठेवले आणि नैसर्गिक शेती करण्याचा मार्...

बोलका व्यवसाय : नवे कुटुंब, नवी नाती-गोती

बोलका व्यवसाय : नवे कुटुंब, नवी नाती-गोती – आयुष्य म्हणजे खरे तर एक भटकंतीच असते. आपण एका मुक्कामावरून निघतो. दुसऱ्या ठिकाणी पोहोचतो. दुसऱ्या ठिकाणावरून तिसरा टप्पा गाठतो. या साऱ्या भटकंतीत अनेक प्रकारची माणसं भेटतात. नवे प्रसंग अनुभवाला येतात. अडचणी येतात आणि त्यावर मात करण्याचे शिक्षणही याच मिळते. काही वेळा ही भटकंती ठरवून असते तर अनेकवेळा अवचित पाहुण्यासारखी ती चालून येते आणि नवे कुटुंब, नवी नाती-गोती तयार करून देते. अनेक वर्षे पुण्यातच आणि तेही अगदी सर्वोत्तम सोयी-सुविधा असलेल्या ऑफिसमध्ये ठाण मांडून बसलेली मी. गेल्या काही महिन्यांपासून ‘विशुद्धम’च्या निमित्ताने पायाला भिंगरी लावल्यासारखी खूप फिरते आहे. सोलापूर, सासवड, कराड, औरंगाबाद अशा अनेक ठिकाणी. २०१७ ला जेव्हा मी नोकरी सोडली. तेव्हा नवे काय करावे, याविषयी डोक्यात अनेक कल्पना भिरभिरत होत्या. आयुष्यातील दोन तपांपेक्षा अधिक म्हणजे तब्बल तीस वर्षे ज्या व्यावसायिक विश्लेषण विषयात झोकून देऊन काम केले. त्याच विषयात आणखी संशोधन करावे. पीएच.डी. मिळवावी, असे वाटत होते. पण विचार स्थिरावत नव्हता. यापूर्वी मी अनेक कंपन्यांमधून कामे केली. व...

खपली गहू [ Emmer wheat - Read English information after Marathi ]

 EARTH'S BUFFET...!!! खपली गहू [ Emmer wheat - Read English information after Marathi ] *प्राचीन आणि वैशिष्टपूर्ण जात असून प्राचीन सभ्यतेच्या आठवणी असलेला हा गहू आहे॰ मध्य  पूर्व [इजिप्त,तर्की,इराण] या ठिकाणच्या उत्खनन्नात [इसपुर्व ९५००काळात] खपली गहू इतिहास दिसून येतो. दक्षिण आशिया भागातील इंडस व्हॅली मध्ये [इसपूर्व-७०००ते ५०००]या वेळेत पोहचला असण्याचा इतिहास आहे. भारतामध्ये खपली गहू हा कश्मीर मध्ये मध्यपुर्व पर्शिया ,अफगाणिस्तान येथून आणि दक्षिण भारतात उत्तरपुर्व आफ्रिका मधून आले असण्याचे अनुमान आहे.  *शेतातून काढणी केल्यानंतर टणक अशा टरफलात असणारा हा गहू असून एका तुसात २ दाणे असतात.बियाण म्हणूनही तो टरफलासाहित वापरला जातो. *तांबड्या रंगाचा व लांबसडक असलेला हा गहू  उपयोग आणणाच्या अगोदर गिरणीत नेवून भरडावा लागतो.  *आंध्रप्रदेश,कर्नाटक ,तमिळनाडू, महाराष्ट्र या राज्यातील काही भागात हा गहू पिकवितात. *जोडगहू, पोपटीया -गुजराती,सांबा -कर्नाटक या नावाने ही खपली गहू ओळखला जातो. *पौष्टिकता [ /१००ग्रॅम ] प्रथिने                ...

Black Salt

 काळ्या मीठाच्या सेवनाचे फायदे वाचून व्हाल हैराण!  Black Salt ✅ घरगुती वापरात हमखास वापरल्या जात असलेल्या काळ्या मीठाचा वापर करून तुम्ही आरोग्य उत्तम ठेवू शकता. काळं मीठं बॅक्टीरीयांना दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं असतं.  ✅ त्यामुळे फॅट्स बर्न होण्यास मदत होते. काळ्या मिठाचा वापर आहारात केल्याने वेगवेगळ्या आजारांपासून दूर राहता येतं.  ✅ केसांच्या उत्तम वाढीकरिता काळे मीठ लाभदायक ठरते. जर केस पातळ असतील, सतत गळत असतील किंवा केसांमध्ये फाटे फुटण्याची समस्या असेल तर आहारामध्ये काळे मीठ समाविष्ट करून ह्या समस्या दूर करता येऊ शकतील.  ✅ काळ्या मिठाने पोट साफ न होण्याची तक्रार दूर होते. तसेच सतत मळमळ होत असल्यास त्यामध्ये काळ्या मिठाच्या सेवनाने आराम मिळतो.  ✅ काळ्या मिठाच्या सेवनाने शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत राहते.  ✅ जर तुमच्या हातायपायांना सूज येत असेल तर त्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर काळे मीठ घालावे. त्यामुळे सुज कमी होण्यास मदत होईल.  ✅ त्वचेची काळजी घेण्यासाठी काळ्या मिठाचा वापर फायदेशीर ठरतो.  ✅ काळ्या मीठाचा वापर करून तुम्ही एसिडिट...

हळद - लाकाडोंग

Image
  लाकाडोंग हळद    बहुगुणी, आरोग्यदायी … मेघालयाची लाकाडोंग हळद आपल्याकडे ‘पी हळद अन् हो गोरी असं होत नाही’ असे घाईघाईने काम उरकणाऱ्यांना म्हटले जाते. त्या मागे असा अर्थ आहे की, काही कामे सखोलपणे, लक्षपूर्वक करायची असतात. त्यात घाई गडबड चालत नाही. पण असे म्हणून आपण विनाकारण हळदीला बदनाम केले आहे. वस्तुत: हळद हा भारतीय भोजन व्यवस्थेतील अतिशय महत्वाचा मसाला आहे. हळदीशिवाय जेवण रुचकर तर होत नाहीच. शिवाय जीवनही शक्तीवर्धक, आरोग्यदायी होऊ शकत नाही. हळदीत त्वचा उजळ करण्याची आणि जखम भरून टाकण्याची अपूर्व ताकद शिगोशिग भरलेली आहे. हे रहस्य हजारो वर्षांपूर्वी जेवण तयार करणाऱ्या भारतीय मातांना कळाले. त्यामुळेच आज भारतातील सर्वच प्रांतातील जेवणात हळदीला प्रचंड महत्व आहे. भारतामध्ये अनेक ठिकाणी हळदीचे पीक घेतले जाते. मुख्यत्वेकरून तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओरिसा आणि पश्चिम बंगालच्या पूर्वेकडील भाग, गुजरात तसेच पश्चिम महाराष्ट्रात हळदीचे उत्पन्न होते. मराठवाड्यातील काही शेतकरीही अलिकडे हळदीच्या शेतीकडे वळाले आहेत. स्वयंपाकात हळदीचा उपयोग खाद्य पदार्थाला रंग येण्यासाठीही ...